फ्रेंडस् मध्ये मला भेटली देव माणसं...!

जत मध्ये मी आलो सन -१९८८ साली तेंव्हा मी मूक बधिर विद्यालय,जत मध्ये माझी नेमणूक झाली.तेंव्हा परिसर, येथे  कोणीही माझ्या ओळखीचे नव्हते.शाळेत तर माझे मूक बधिर विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी आणि मी या जत मध्ये  समजावून माझे ज्ञानदानाचे कार्य करीत जत व जत तालुक्यातील नागरिक बंधू भगिनी अभ्यास करीत होतो.येथील प्रसिद्ध व्यक्ती, मुख्याध्यापक, संस्था चालक, कलाकार, चित्रकार, लेखक वक्ते आणि प्रसिद्ध स्थळे या मला जत नगरीत अनेक नवरत्ने भेटली! फ्रेंडस् आणि माझ्या जीवाभावाची नात्यांची! त्यामुळे माझ्या जीवन आनंदवन केंव्हा झाले हे मला समजले bharath 


मुक बधिर विद्यालय असताना भेटले मा.श्री.ऐनापुरे काका ते दररोज शाळेत यायचे आमची विचारपूस करायचे ... आम्हांला पगार नव्हता. संस्था आम्हांला पगार म्हणून काही रक्कम देत होती.त्यामध्ये काही अडचणी आल्यास आम्ही शिक्षक जत मेडिकल मध्ये जाणार... तेंव्हा ते आम्हाला विचारायचं काय अडचण आहे. तेंव्हा आम्ही ते पैसे पाहिजेल जी रक्कम मागेल त्यापेक्षा पन्नास रुपये जास्त देत असतं!मुक बधीर मुला विशेषी काकांना  खूप प्रेम होते. शाळेत नवीन काही गेले तर ते स्वतः शाळेत कौतुक करीत असे.त्यावेळी ते दि फ्रेंडस् असोसिएशन, जत चे चेअरमन आहेत.मला  त्यांच्या  शाळेत एक आदर्श मुख्याध्यापक डॉ.श्रीपाद जोशी होते.  मला श्री.ऐनापुरे काकांच्या सल्ला मला दिला डाॅ.श्रीपाद जोशी साहेबांची यांची भेट घ्या...
फ्रेंडस् च्या परीवारामध्ये एकरूप झालो समजले नाही.
ऐनापुरे काका प्रेम वडीलासमान करायचे!मी आजारी पडलो तेंव्हा काही गोळ्या जत मध्ये मिळाल्या नाहीत.तेंव्हा दोन त्या गोळ्या सेवका- व्दारे घरी पाठविल्या.असे  चेअरमन भेटणार  नाही ...तर ते मला देवदूतच वाटले! नवीन कल्पना त्यांना समजली की ते मला सांगायचं. आम्हांला ते फ्रेंडस् वाटायचं! 
मा.ऐनापुरे काका फ्रेंडस् चे नवरत्न होते!
कै.वाय.आय. तंगडी
कै.श्री तंगडी वाय. आय. विश्वास्त.        
                                                                                             🔵  डाॅ.श्रीपाद जोशी, शिक्षणतज्ज्ञ:
जत हायस्कूल, जत मध्ये सेवेला सुरुवात झाली. पण अजून ऑर्डर मिळाली नव्हती. कामकाज सुरू होते.  माझी आर्थिक स्थिती बेताची होती. मला ऑर्डर केंव्हा मिळणार याची चिंता लागून राहिली होती. शाळा सुटल्यानंतर मी गावातून जात होतो. तेव्हा  समाजसेवक श्री.  कुलकर्णी,भाऊ  मला भेटले .अहो! शिंदे सर कुठे निघालात ? नाराज दिसताय... मी त्यांच्याजवळ गेलो. त्याला नमस्कार केला‌. आणि माझ्या
 मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांनी पण मला जवळ घेतले आणि सुभाषराव आपण थोड्या वेळेत  तंगडी मळ्यामध्ये जायचं आहे. असं त्यांनी मला सांगितलं मला भीती  वाटली.काका कडं, मी नाही येणार ‌... तुम्हीच  सांगा, ते म्हणाले मी सांगतोय ,असं तुम्ही करायचं  नाही.तिथेश्री. पवारांची चार चाकी गाडी होती. वाचनालय पासून आम्ही चार  चाकी गाडीतून आमचा प्रवास तंगडी मळ्याच्या दिशेने निघाला. माझ्या मनात खूप भीती होती. मी नवीन होतो . काका पुढे बोलायची माझी हिम्मत नव्हती. शिवाय भाऊंना घेऊन मी मळ्यात आलोय.. म्हटल्कायानंतर  काय होईल याची  मला चिंता होती. साडेसात ते आठ च्या दरम्यान आम्ही तंगडी मळ्यामध्ये  पोचलो. भाऊंनी काकांना आवाज दिला. कोण आहे ..? भाऊ म्हणाले मी भाऊ कुलकर्णी आहे. असं म्हणल्यावर काका आत मध्ये जेवणासाठी बसले होते. तेवढ्यात आम्ही तिथे पोहोचलो. त्यांनी भाऊलाच  आत बोलवलं ... बसं जेवायला नंतर बोलु आणि एवढ्या रात्री काय आहे काम ? होय, काम आहे. मी एकटा आलो नाही. माझ्याबरोबर तुमच्या शाळेतील श्री. शिंदे सर पण आलेत. चित्रकलेचे  होय, तुमची त्यांची  कशी ओळख ? भाऊ म्हणाले ,सर आमच्मया मळ्यातच मूकबधीर विद्यालय जत होते. त्यांची माझी ओळख चांगली आहे. सर, कष्ट करतात .प्रेमळ आहेत.  आता. ते  तुमच्या शाळेत नोकरीला आहेत. होय,  असे काका म्हणाले,   भाऊ आता थांबा, काकांनी मला हाक मारली. सर ,आत हा या म्हणल्यावर मला खूपच भीती वाटली. आता काय होते ,  काका म्हणाले तुम्ही येऊन बसा जेवायला आणि माझा जीव भांडत पडला. एवढा मोठा माणूस त्यांच्याबरोबर जेवायला बसलो .मनात आनंद, डोळ्यात असू  व हृदयात प्रेम या भावना माझ्या मनात दाटून आला .आपण एक शिक्षक पण त्यांनी मला बरोबर बसून जेवण केलं .ज्या संस्थेत मी नोकरीला आहे .अजून माझी ऑर्डर नाही, पगार नाही दि फ्रेंडस् असोसिएशन ,जत  ही संस्था कशी वेगळी वाटली. काका म्हणाले काळजी करू नका .मी तुमच्या पाठीशी आहे. माझा  पण एक मुलगा सुभाष आहे ,तसं तुम्ही!  हा  विचार ऐकायल्यावर कुण्या  एका जन्माची कहाणी माझ्या  जीवनात  घडली असं मनात  येऊन  गेले! काका आणि भाऊ कुलकर्णी बोलत होते . मी बाहेरच्या खुर्चीवर बसून त्यांचं संभाषण ऐकत होतो. नंतर त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं तुम्ही फक्त काम करा सर्व  काही मी बघतो .हा शब्द लाखमोलाचा मला असं वाटलं! देवच माझ्या पाठीशी आहे . जन्माला येऊन  दि फ्रेंडस् असोसिएशन, जत या संस्थेत मला नोकरी मिळावी. यासाठी ज्या वेळेला  मूक बधीर विद्यालयांमध्ये नोकरीस होतो .असं माझं स्वप्न होतं ! डॉ. श्रीपाद जोशी सारखं ज्ञानवंत , मुख्याध्यापक यांच्या सहवासात राहावं.  सुंदर काम करावं ही इच्छा होती. तेंव्हापासून काका आणि माझं नातं एक वेगळंच होतं .ते मला सुट्टीच्या वेळी मला बोलवायचे , शैक्षणिक व इतर काही गोष्टीची चर्चा करायचे. ते नेहमी संस्था ,शाळा विषयी बोलायचे ! आपली  संस्था  दि फ्रेंडस् असोसिएशन, जत ही संस्था मोठी झाली पाहिजेल .या संस्थेत गुणवंत ,ज्ञानवंत शिक्षक ,शिक्षिका असायला पाहिजेल अशी त्यांची संकल्पना होती. मी त्यांना तेव्हांपासून आज अखेर माझ्या समस्या कधीही सांगितल्या नाहीत. पण काकांना कळालं ते मला बोलवत काय झालं?   मग असं करा आणि योग्य ती सल्ला देत. काका,दि फ्रेंडस् असोसिएशन ,जत या संस्थेचे आधारस्तंभ होते. त्यांच्या संकल्पना,  कल्पना साकार करायची धमक काका मध्ये होती. काका जे शिक्षक छान काम करतात त्यांना प्रेरणा देण्याचे काम काकांनी  केलं आहे.ते केव्हाही विविध संकल्पना संस्थेत आणायचे असेल तर आम्हांला बरोबर घेऊन वेगवेगळ्या  शिक्षण  संस्थांना भेटी दिल्या. त्या नवीन संकल्पना आमच्या शाळेमध्ये, संस्थेमध्ये ज्या सुरू आहेत. काका म्हणायचे  नवीन काही दिसलं ते आपण  आपल्या  शाळेत असले पाहिजेल . शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी गुणात्मक खेळामध्ये ,स्पर्धेमध्ये यश संपादन केल्यानंतर त्यांना खूप आनंद  वाटायचा , ते आनंदाने सर्वांना सांगत असत. असे एक प्रसंग आहे त्यांच्या मनात विविध कल्पना प्रत्यक्षात आणण्याची  ताकद होती. जीवन अमृतमय जाहाले.. जीवन व कार्य ही पुस्तिका लेखन: डॉ. श्रीपाद जोशी यांनी केलं. त्यावेळी हे पुस्तक तयार करण्यामध्ये मी सक्रिय होतो. त्यावेळी मला काकांच्या जीवनातील विविध प्रसंग ,विविध शहरांमध्ये प्रवास ,जी राजकीय व्यक्ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी  यांच्या  सहवासात फोटो पाहिला.राजकीय नेते असो यांच्याशीही संवाद अशा विविध गोष्टी मला माहिती झाल्या. पुस्तकात  फोटो पाहिजेल  होते. मी सांगलीला काका चे चिरंजीव गिरीश तंगडी यांच्याकडे घरी गेलो. मी त्यांना सांगितलं काकांनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे. . काही फोटो मला द्या. मला वाटलं एक दुसरा फोटो देतील किंवा एखादा अल्बम देतील. गिरीशनी कपाट उघडलं आणि माझ्यापुढे असंख्य अल्बम ठेवले हे बघा  सर ....फोटो काकांचे  आहेत.पाहिजेल  तेवढे घ्या. मी  आश्चर्याने त्या फोटो कडे  बघत  होतो . ते फोटो मी दोन तास मी फोटो बघत होतो. तेवढ्यात वहिनी आल्या चहा घ्या सर ,अजून  आतमध्ये फोटो आहेत. खरंतर मला मोजकेच चार-पाच फोटो पाहिलेल होते . त्यांनी तर अनेक अल्बम माझ्याजवळ ठेवले  होते.  खरंतर गिरीश साहेब आणि वहिनी यांचा परिचय  नव्हता मला, कधी त्यांना  पाहिले नव्हते.  घरामध्ये असे बोलायचे की आपल्या घरालाच  आहे.भाऊसमान आहे असे बोलायचे ‌मन भरून आलं .मी एक अल्बम घेतला त्यांतील  काही  फोटो  घेतले. काकाचा हा इतिहास या छोट्याशा पुस्तिकेमध्ये साकार होणार नाही‌ त्यासाठी एक मोठं पुस्तक लिहिलं पाहिजेल .असं माझ्या मनाला  वाटलं!   काका, काकू नी तंगडी  परिवार  , घराण्यातील  माणसा प्रमाणे  दि फ्रेंडस् असोसिएशन,जत परिवार  हा आपला मानला !असं  मला वाटतं ! 
काका जीवनातील अनेक प्रसंग आज सुद्धा मनात घर आहेत. त्यांच्या जीवनशैलीतून आम्हांला खूप शिकण्यासारखे आहे. 
देव आहे किंवा नाही हे माहित नाही. पण काका सारखी देवमाणूस आहे हेच खरं! दि फ्रेंडस् असोसिएशन, जत मध्ये सेवा करताना काकांची लाख मोलाची होती.
अशा पण काही शैक्षणिक संस्था आहेत.नाही भांडण तंटा, प्रत्येक जण जपतो हे मायेचे छत्र!
या संस्थेला माझा त्रिवार वंदन....!
काका यांना विनम्र अभिवादन!
मुक बधिर विद्यालय जत मध्ये असताना श्री ऐनापुरे काका यांच्या सल्ल्याने भेट घेण्यासाठी मी व श्री.कदम सर जत हायस्कूल,जत गेलो. पांढरे शुभ्र गणवेश त्यांनी नम्रपणे आमच्या आधी त्यांनी नमस्कार केला.मी त्यांच्या पायावर ती डोकं ठेवून नमस्कार केला. गुरुतुल हा व्यक्तीच्या सहवासात नोकरी करायची संधी मिळायला पाहिजेल असं माझ्या मनात विचार येऊन गेला.
त्यावेळी बोलताना वेळ किती वेळ झाला हे आम्हाला समजले नाही.श्री.गुरव मामा आत आला आणि म्हणाला साहेब ७.३०वाजले हो.अण्णा आम्ही निघालो ... कुलुप लावा.मी एक.. दोनदा  दिवसात  डॉ.जोशी साहेबांची भेट घेत असे, त्यांच्या अक्षरांनी वेड लागले! त्यांनी लिहिलेल्या वह्या मी मागून घेई. मुक -बधिर ते जत हायस्कूल,जत प्रवास सुरू झाला.‌...!
श्री.ऐनापुरे काका व डॉ.श्रीपाद जोशी ते संचालक म्हणून कामकाज पाहत होते. 
काही कालावधीनंतर मी जत सोडून मुंबईला नोकरीस दैनिक सामना मध्ये आर्टिस्ट विभागात कामकाज गेलो.एका वर्षात माझ्या वडिलांचा अपघात झाला.आणि मी सांगलीला आलो. वडिलांना उपचार केले.आणि मुंबई ला जाण्याचा  विचार करत होतो.तेंव्हा मी त्यावेळेचे शिक्षणाधिकारी मा.श्री.म.ल. देसाई साहेबांना भेटलो आणि त्यांनी मला सांगितले सुभाष तू सांगली मध्ये नोकरी करा. मला नोकरी कोण देणार... साहेब!मी आहे ना! सांगली जिल्ह्यात काही जागा रिक्त आहेत.उद्या या ....मी सांगलीला गेल्यावर त्यांनी एक कागद माझ्या दिला . रिक्त जागाच्या गावाची नावे होती .त्यामध्ये 
तीन क्रमांक ला जत हायस्कूल, जत नाव होते.साहेबांनी  मला  नाव निवडा असे सांगितले.तेंव्हा मी जत हायस्कूल,जत ची निवड केली. साहेब म्हणाले सुभाषराव तुम्ही ती का निवड केली? मी जत मध्ये होतो.डाॅ.श्रीपाद जोशी, साहेब यांच्या कडे काम करायची इच्छा आहे.ती पूर्ण होईल ...!
साहेब!हसले  डॉ.जोशी गुरुजी माझे पण मित्र आहेत.
मग काय डॉ.जोशी साहेबांनी !माझे सर्व काही गुरूवर्य,आई, वडील सर सर्व जबाबदारी त्यांनी पार पडली. सरांनी मुलासारखा जपलं!जत माझे माझं जीवनच फुललं! दुष्काळात होरपळत असताना पण माझ्या जीवनात डॉ.श्रीपाद जोशी साहेबांनी एक कलायात्री चा प्रवास आनंददायी केला ! माझे वडील नेहमी सांगायचे डॉ.जोशी गुरुजी हे साने गुरुजी आहेत.त्यांना तू केव्हाही विसरू नकोस! त्यांच्या सहवासात राहून एक छान कार्य कर!
खरंच! माझ्या वडिलांचे शब्द मी केंव्हास विसरणार नाही.
संस्थेत विविध उपक्रमांनी होत असे त्यामध्ये सहभागी होताना आनंद वाटत होता.
मा.डाॅ .मदन बोर्गीकर,  चेअरमन , दि फ्रेंडस् असोसिएशन,जत. ता. जि.सांगली.
जत शहरात अनेक सुजन नागरिक आहेत.ही त्या व्यक्तीचं नाव घेतलं की मनात नेहमीच मानाचं स्थान आहे.
नेहमीच हसतमुख चेहरा, उंच देहयष्टी नजरेत भरणारा आवाज! वैद्यकीय पेशाने डॉक्टर, उत्कृष्ट क्रिकेटपटू , गायक,वक्ता, एक सामाजिक कार्यकर्ता, एका आदर्श शिक्षणसंस्था च्या आदर्श व्हा.चेअरमन! 
वैद्यकीय सेवा करताना... पेशंटला प्रेमाने वागणूक देतात .सर दि फ्रेंडस् असोसिएशन जत संस्थे मध्ये आपल्या नवनवीन संकल्पना मांडला त्यामुळे त्यांचा उपयोग संस्था विकास साठी उपयोग झाला.
सर्व शिक्षक, शिक्षिकांची संबंध आपुलकीचे संबंध आहेत.
🟨🟪🟪🟨🟨🟪🟧🟧🟨🟨🟪🟧🟧🟨
डाॅ. एस. वाय.तंगडी
डॉ.साहेब यांचे व्यक्तिमत्त्व हसतमुख, निरीक्षण दृष्टी अचूक असते.
कै. जी.आर. कुलकर्णी
मा.श्री.डी.व्ही. पोतदार 
मा.श्री.जी.एस.  बिज्जरगी








Comments