लायन्स क्लब ऑफ जत अध्यक्ष मा.ला.डाॅ. रवींद्र आरळी जत तालुक्यातील एक उच्च शिक्षित सुसंस्कृत नेता !


वैद्यकीय सेवा ते समाजकारण, राजकारण ! 
असा एक उच्च शिक्षित सुसंस्कृत नेता! 💠 मा.ला. डॉ.रवींद्र आरळी 
रुग्णांना वैद्यकीय सेवा देता देता राजकारण, समाजकारणात लीलया वावरत असताना शैक्षणिक संस्था उभा करणं, आजार, रोग यांबाबतीत लोकांमधले समज- गैरसमज दूर करण्यासाठी गावोगावी जाऊन व्याख्यानं देणं किंवा त्याबाबत पुस्तक लिहिणं अशी कितीतरी कामं ते सहज पार पाडतात. डॉ. रवींद्र आरळी यांना शिक्षणाची सोय झाली आहे.
सीइटी सेलच्या माध्यमातून याठिकाणी ऑनलाईन प्रवेश मिळवता येणार आहे. शंभर विद्यार्थी क्षमतेचे  कॉलेज असून यासाठी योग्य ती व्यवस्था , विद्यार्थ्यांच्या राहण्याची उत्तम सोय, तज्ज्ञ कर्माचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे जतच्या वैद्यकीय क्षेत्राला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आहे. डॉ. रवींद्र आरळी हे चतुरस्र व्यक्तिमत्व आहे. ते एक उत्कृष्ट वक्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध आहेत. एक उत्कृष्ट वक्ता एक उत्कृष्ट नेता होऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे. अत्यंत मार्मिक भाषा, विनोदाची झालर, अभ्यासपूर्वक मांडणी, अनुभवातून साकार झालेली मधुरवाणी यामुळे त्यांची गणना सध्याच्या आघाडीच्या वक्त॒यांमध्ये होते. अनेक व्याख्यानमालांमध्ये त्यांनी मानाचे स्थान प्राप्त केले आहे. काही वर्षांपूर्वी जतमध्ये एड्सचे सर्वाधिक रुग्ण होते. त्यावेळी डॉक्टरांनी अगदी गावोगावी जाऊन या विषयावर व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन लायन्स क्लबने त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

डॉ. आरळी यांना समाजकारणाची आवड पहिल्यापासूनच होती. जत शहरात लायन्स क्लबची स्थापना प्रथम त्यांनीच केली. या लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यात वृक्षारोपण, एडस्‌ विषयावर व्याख्याने, आरोग्यावर व्याख्याने तसेच दुष्काळात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाटप, ब्लँकेट वाटप आदी उपक्रम राबविले. लायन्स क्लबच्या माध्यमातून जत तालुक्यात दुष्काळ काळात बरीच कामे झाली आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यात त्यांचाही हातभार लागला आहे. 

डॉ. रवींद्र आरळी 

 यांनी आहारशास्त्र, आरोग्य, स्त्रियांचे आजार, अंधश्रद्धा, आजाराबाबत व आरोग्याबाबतचे अज्ञान, कॅन्सर अशा अनेक विषयांवर हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. महिलांच्या आरोग्यविषयक शंका व गैरसमज या विषयावर त्यांनी समज-गैरसमज हे अतिशय माहितीपूर्ण व संग्रही ठेवावे असे पुस्तक लिहिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत स्त्रीरोग, वंध्यत्व, नेत्ररोग, दंतरोग, मधुमेह, ज्येष्ठांची तपासणी अशी अनेक मोफत शिबिरे, रक्तदान शिबिरे, मोफत औषध वाटप असे सामाजिक उपक्रम राबविले आहेत, ग्रामीण भागात आरोग्य विषयक व्याख्यानमाला अखंडपणे चालवून राज्यातील अनेक तज्ञांचे मार्गदर्शन जतकरांसाठी उपलब्ध करून दिले आहे. लायन्स क्लब, लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, जीवनरेखा ब्लड बँक, बसवेश्वर शिक्षण संस्था, उमा इन्स्टिट्यूट आफ नर्सिंग एज्युकेशन, उमा इंग्लिश मीडियम स्कूल, धनलक्ष्मी पतसंस्था, उमा चॅरिटेबल ट्रस्ट, शांताबाई शिवशंकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,जत, सिनर्जी सुपर स्पेशलिटी हास्पिटल, मिरज, शांताबाई आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल व कालेज, जत अशा अनेक संस्थांचे ते संस्थापक आहेत. वैद्यकीय व्यवसाय अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळून त्यांनी यशाची अनेक शिखरे सर केली आहेत. एक राजकारणी म्हणून ही त्यांचे काम अतिशय आदर्शवत असे आहे. भाजपचे ते सुरुवातीपासून एकनिष्ठ सभासद आहेत .भाजपचे तालुकाध्यक्ष ,जिल्हा उपाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष, सांगली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. अतिशय व्यस्त असतानाही त्यांनी केलेली समाजसेवा, विविध उपक्रम हे खरेच न उलगडणारे कोडे आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे म्हणून डॉ. रवींद्र आरळी म्हणजे एक किमयागार आहेत.

उच्चशिक्षित होऊन काही जण शहरात जातात.पण डॉ.आरळी साहेब त्यांनी तसे केले नाही.जत मध्ये राहून सर्व क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करावा तेवढा थोडाच आहे.

    लायन्स क्लब ऑफ जत ची स्थापना करून त्यामधून त्यांनी राज्यातील तज्ज्ञ व्यक्तींना जत मध्ये आणले. विविध उपक्रमांची

राज्यस्तरीय नोंद घेतली गेली .

त्यांनी नवीन प्रकल्प, उपक्रम घेतला नंबर त्यांच्या अभ्यास करूनच राबविण्यात त्यामुळे त्यांचा फायदा होतो ‌.







Comments